तंत्रज्ञानशिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षांसाठी 2 लाख 36 हजार1 उमेदवारांचे अर्ज....

शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षांसाठी 2 लाख 36 हजार1 उमेदवारांचे अर्ज….

spot_img

महाराष्ट्र राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ अर्थात TAIT या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मदत 14 मे रोजी संपली असून यया परिक्षासाठी सुमारे 2 लाख 36 हजार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत.
TAIT परीक्षा (TAIT exam) ही 24 मे ते 5 जून या कालावधीत घेण्याचे नियोजित आहे.मात्र, विद्यार्थी संख्या बघता परीक्षा केंद्रातील भौतिक सुविधांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांची सोय विचारात घेऊन परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या जाणार आहेत,असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दोनदा TAIT परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी 14 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती.

चालू वर्षांपासून शासन आदेशानुसार डी.एड, बी. एड आणि एम. एड या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात असणारे किंवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस पात्र (Student Eligibility) ठरविण्यात आले. त्यामुळे अनेक Conversations परीक्षा देण्याची संधी प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र राज्यात शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे. शिक्षक भरती होण्यासाठी TAIT परीक्षा आवश्यक आहे. या परीक्षेत गुणवत्तेसह उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरतीत संधी मिळू शकते.त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांच्या स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षा असल्यास संबंधित विद्यार्थ्यांकडून माहिती संकलित करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, या सर्वचा विचार करून व काळजी घेऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन केले जाणार आहे, असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.या परीक्षेचे आयोजन IBPS मार्फत केले जात आहे त्यामुळे बँकिंग परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
परीक्षा पॅटर्न MahaTAIT Exam Pattern 2025
परीक्षेत एकूण 200 प्रश्न विचारल्या जातील
परीक्षा एकूण 200 गुणांची असेल
परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे (2 तास) असेल.
परीक्षेत Negative Marking राहणार नाही
Aptitude (अभियोग्यता) साठी 120 प्रश्न असतील आणि त्याला 120 मार्क असतील. तर Intelligence (बुध्दिमत्ता) साठी 80 प्रश्न असेल आणि प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क असेल म्हणजेच 80 गुण असतील. या दोघ प्रकारचे प्रश्न मिळून परीक्षा 200 मार्कसाठी होईल. शासन निर्णयात Aptitude (अभियोग्यता) आणि Intelligence (बुध्दिमत्ता) हे मुख्य विषय देण्यात आले आहे तरी यात प्रामुख्याने मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र, गणित व बुद्धिमत्ता या विषयाचा समावेश आहे. यात इंग्रजी भाषेसाठी प्रश्न 15 असतील आणि गुण 15. मराठी भाषेसाठीही 15 प्रश्न विचारले जातील. सामान्य ज्ञानाचे 30 प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाला एक गुण देण्यात येईल. बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्रासाठी (Child Psychology and Pedagogy)30 प्रश्न असतील. अंकगणित (Quantitative Aptitude) साठी 30 प्रश्न असतील.

हेही वाचा  ग्रामीण भागातील मुलगा झाला कलेक्टर.....

मागील वर्षी विविध विद्यार्थी या परिक्षमधून शिक्षक पदासाठी निवडले गेले आहे ग्रामीण भागातील विविध विद्यार्थी निवडले गेले आहे.त्यामुळे विविध शिक्षक निवड होण्यासाठी प्रयत्न करत आहे

spot_img

आणखी महत्वाच्या बातम्या

spot_img

आणखी वाचा

सोनई येथे तंत्रनिकेतन महाविद्यालयास मान्यता….

सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोनई या महाविद्यालयाला वर्ष...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई देवगडच्या श्री गुरूदेव दत्त पिठाचे भक्त…

नेवासा : भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे नव्यानेच नियुक्त झालेले सरन्यायाधीश श्री भूषणजी गवई साहेब हे...

राहुरी शिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी लवकरच होणार भूसंपादन….

राहुरी-शनिशिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून लवकरच भूसंपादन केले जाणार आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने...

अकरावी प्रवेश प्रक्रिया होणार ऑनलाईन शिक्षण विभागाचा निर्णय……

महाराष्ट्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत सूसुत्रता आणण्यासाठी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीची प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी...