महाराष्ट्रअकरावी प्रवेश प्रक्रिया होणार ऑनलाईन शिक्षण विभागाचा निर्णय......

अकरावी प्रवेश प्रक्रिया होणार ऑनलाईन शिक्षण विभागाचा निर्णय……

spot_img

महाराष्ट्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत सूसुत्रता आणण्यासाठी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीची प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार (कॅप इंजिनीअरिंगच्या धर्तीवर) होणार असून, राज्यातील विद्यार्थ्यांला कोणत्याही ठिकाणच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज करता येईल. यंदाच्या अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १९ मेपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे

अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

शाळा, महाविद्यालयांची माहिती पोर्टलवर नोंद करणेः ८ ते १५ मे

उच्च माध्यमिकच्या शाखांची माहिती प्रमाणित करणेः ८ ते १६ मे

ऑनलाइन प्रोफाइल तयार करणे आणि अर्ज करणेः १९ ते २८ मे

विद्यार्थ्यांनी ज्युनिअर कॉलेजांनी प्राधान्यक्रम भरणेः १९ ते २८ मे

शून्य फेरी, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक व इनहाउस कोट्यातील प्रवेश निश्चितीः

महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरूनच प्रवेश प्रक्रिया होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार ज्युनिअर कॉलेज निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेत चार नियमित फेऱ्यांनंतर ‘सर्वांसाठी खुला प्रवेश’ (ओपन फॉर ऑल) नावाची विशेष फेरी जाहीर केली जाईल. या प्रवेश प्रक्रियेतही प्रवेशासाठी कोटा पद्धती राहणार आहे. त्यानुसार व्यवस्थापन, अल्पसंख्याक व इनहाउस कोट्यांतर्गत प्रवेशासाठी स्वतंत्र ‘शून्य फेरी’ होईल.

नेवासा तालुक्यातील मुळा एज्युकेशन सोसायटीचे ज्युनियर कॉलेजमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा,ग्रंथालय,खेळाचे मैदान तसेच विविध गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते त्यामुळे सर्व परिसरातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म व्यवस्थित भरून महाविद्यालयाची निवड करावी असे आव्हान प्रा प्रताप येळवंडे यांनी केले आहे.

हेही वाचा  वाचन केल्यामुळे विद्यार्थी होतात सर्वगुण संपन्न......
spot_img

आणखी महत्वाच्या बातम्या

spot_img

आणखी वाचा

सोनई येथे तंत्रनिकेतन महाविद्यालयास मान्यता….

सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोनई या महाविद्यालयाला वर्ष...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई देवगडच्या श्री गुरूदेव दत्त पिठाचे भक्त…

नेवासा : भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे नव्यानेच नियुक्त झालेले सरन्यायाधीश श्री भूषणजी गवई साहेब हे...

राहुरी शिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी लवकरच होणार भूसंपादन….

राहुरी-शनिशिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून लवकरच भूसंपादन केले जाणार आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने...

शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षांसाठी 2 लाख 36 हजार1 उमेदवारांचे अर्ज….

महाराष्ट्र राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' अर्थात TAIT या परीक्षेसाठी अर्ज करण्याची...