शिक्षण काळाची गरज झाली आहे शिक्षणाबरोबर वाचन केल्यामुळे विद्यार्थी ज्ञानी होऊन सर्व गुण संपन्न होतात.बालपणीचे वय शिक्षणाचे वय असते.या वयात विद्यार्थी जर ग्रंथालयासोबत जोडला गेला तर आयुष्यात नक्की उच्च शिखर गाठल्याशिवाय राहत नाही.वाचनामुळे विद्यार्थ्या व शिक्षक एकत्र येतात.वाचनासाठी विविध ग्रंथ कादंबरी , वर्तमानपत्र नियत कालिके असतात याचा वापर विद्यार्थीनी केला पाहिजे असे प्रतिपादन पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांनी व्यक्त केले.
मुळा एज्युकेशन संस्थेच्या शिरेगाव येथील महात्म्या गांधी माध्यमिक विद्यालयास सदिच्छा भेटनिमित्त झालेल्या स्वागत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुख्याध्यापक लहानू ढाले यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी दादासाहेब होन, अविनाश जाधव, दादासाहेब तुवर, शिरेगाव येथील माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण करताना पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख व शिक्षकवृंद उपस्थित होते
पुस्तक विचार शैली वाढवते पुस्तकामुळे विविध संकल्पना समजतात भविष्यात येणाऱ्या अडचणी समजण्यासाठी उपयुक्त ठरते.असे प्रतिपादन सुनीताताई गडाख यांनी केली तसेच विविध उपक्रमची माहिती घेतली.