महाराष्ट्रग्रामीण भागातील मुलगा झाला कलेक्टर.....

ग्रामीण भागातील मुलगा झाला कलेक्टर…..

spot_img

ग्रामीण खेडे गावातील मुलगा चक्क केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC Result) उत्तीर्ण झाला आहे बिरदेव डोणे असे त्यांचे नाव आहे. मुरगूड शिवतीर्थपासून मूळ गावी यमगे (ता. कागल) येथील घरापर्यंत धनगरी ढोल, लेझीम पथक, हलगीचा कडकडाट आणि जेसीबीमधून पुष्पवृष्टी अशा जल्लोषी वातावरणात त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेले त्यांचे मित्र, पाहुणे आणि हजारोंच्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान, गावातील प्रमुख मार्गावरून आलेली मिरवणूक बिरदेव डोणे (Birdev Done) यांच्या घराजवळ आली. या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने भव्य मंडप उभारून बिरदेव यांच्या सत्काराचा सोहळा सर्वांना पाहता यावा यासाठी नेटके नियोजन केले होते.

सत्काराला उत्तर देताना बिरदेव म्हणाले, ‘मी साधा आहे, मला साधाच राहू द्या. साधं राहून जगण्यात जी मजा आहे, ती मोठं होऊन जगण्यात नाही. साधेपणातच फार मोठी श्रीमंती आहे. मला कामातून मोठं होऊ द्या…!!,’ अशी भावनिक साद उपस्थितांना घातली. यावेळी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला.

मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास झालेले बिरदेव डोंणे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्रामीण भागातील मुले यांच्याकडे ज्ञान ग्रहण करण्याची प्रचंड क्षमता आहे.स्पर्धा परीक्षा तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी देते.असे प्रतिपादन यशवंत स्टडी क्लबचे समन्वयक प्रा सचिन शेटे यांनी केले आहे.

हेही वाचा  दारू दुकाने परवाना बंद करण्यासंदर्भात नवीन नियमावली....
spot_img

आणखी महत्वाच्या बातम्या

spot_img

आणखी वाचा

सोनई येथे तंत्रनिकेतन महाविद्यालयास मान्यता….

सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोनई या महाविद्यालयाला वर्ष...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई देवगडच्या श्री गुरूदेव दत्त पिठाचे भक्त…

नेवासा : भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे नव्यानेच नियुक्त झालेले सरन्यायाधीश श्री भूषणजी गवई साहेब हे...

राहुरी शिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी लवकरच होणार भूसंपादन….

राहुरी-शनिशिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून लवकरच भूसंपादन केले जाणार आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने...

शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षांसाठी 2 लाख 36 हजार1 उमेदवारांचे अर्ज….

महाराष्ट्र राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' अर्थात TAIT या परीक्षेसाठी अर्ज करण्याची...